तुम्ही सगळेच निघून जा ..
लवकर निघा बरं..
उशीर नका करू ..
तुम्ही गेल्याशिवाय ,
ती नाही येणार ..
तुम्ही उशीरा गेलात तर,
तिलाही नंतर घरी जायला उशीर होईल ..
नवरा खाष्ट आहे तिचा,
घरी परतायला उशीर करून चालत नाही .. !!
म्हणून म्हणतो ,
लवकर निघा ..
लगबग करा
उगाच उशीरापर्यंत ताटकळत नका बसू ..
ती येऊन गेली
आणि
तिच्या घरी सुखरूप पोहचली ..
की ,
.
.
.
कावळा शिवेल नक्की पिंडाला माझ्या ..!!