तू भेटत रहा ,
कधी शांत गार वा-यातून .
कधी चांदण्यांच्या पसा-यातून ..
तू भेटत रहा ,
कधी पावसाच्या पहिल्या भिजेतुन..
कधी लक्ख विजेतून..
तू भेटत रहा ,
कधी इन्द्रधनुच्या सज्जेतुन..
कधी नववधुच्या लज्जेतुन ..
तू भेटत रहा ,
कधी विरहाच्या अंगारातून ..
कधी मिलानाच्या श्रुंगारातून ..
तू भेटत रहा ,
कधी स्थितप्रद्न्य ध्यानातुन..
कधी चंचल विज्ञानातून..
तू भेटत रहा ,
कुणा माउलीच्या डोळ्यातून..
कधी तिच्या मात्रुत्वाच्या सोहळयातून..
तू भेटत रहा ,
पापण्याआड अश्रुंच्या साठवातुन
डोंळयाआड जपलेल्या आठवातुन..
तू भेटत रहा ,
अबोल शांत चांदण्यातुन
ग्रीष्माच्या कठोर भाजन्यातुन..
तू भेटत रहा ,
अर्जुन झालो.. तर कृष्णसखा बनुन..
झालोच दुर्योधन... तर कर्ण पाठीराखा बनुन ..
तू भेटत रहा.....!!!
विनायक
२६ मार्च ०९