Sunday, May 15, 2011

निरोपाच बोलण ...!


निरोपाच बोलण जरा लांबव..
थोड़ा श्वास घे ..
उछवासही टाक उगाच ..
अन बाकीच डोळयातुनच संपव.. !

विषय वाढवायचाच म्हणुन आठव ....
तो पुनवेचा चंद्र,
अमावस्येचा अंधार
अन् बाकीच आठवणीतच संपव ...!

तसा काही विशेष आठवु नको...
सोबत पाहिलेली स्वप्न ही ,
अन् मनोराज्य ही...
तुटणारां तारा पुन्हा दाखवू नको..!


जमलंच तर राहू दे तसाच...
अंगावरचा शहारा,
अन् स्तब्ध राहिलेला वारा..
डोळयातलं पाणी वाहू दे उगाच...!

विसरून जा ती पाउलवाट
तो भरतिचा चंद्र,
आणि ओहोटीची लाट
वाळुंतली नावे ही पुसून टाक...!

आता इतका करतेच आहेस तर..
पुनॅजन्माच वचन देऊन टाक,
अजुन थोड़ा खोट बोलून टाक
त्या जन्मी तरी "पुन्हा भेटू " म्हणून टाक...!


-- 

No comments:

Post a Comment

प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो  रात्र सायली होते ,  तुझिया अस्तित्वाने  श्लोक-शायरी होते।  मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...