Tuesday, May 24, 2011

तू भेटत रहा ...!



तू भेटत रहा ,
कधी शांत गार वा-यातून .
कधी चांदण्यांच्या पसा-यातून ..

तू भेटत रहा ,
कधी पावसाच्या पहिल्या भिजेतुन..
कधी लक्ख विजेतून..

तू भेटत रहा ,
कधी इन्द्रधनुच्या सज्जेतुन..
कधी नववधुच्या लज्जेतुन ..

तू भेटत रहा ,
कधी विरहाच्या अंगारातून ..
कधी मिलानाच्या श्रुंगारातून ..
  
 

तू भेटत रहा ,
कधी स्थितप्रद्न्य  ध्यानातुन.. 
कधी चंचल विज्ञानातून..

तू भेटत रहा ,
कुणा माउलीच्या डोळ्यातून.. 
कधी तिच्या मात्रुत्वाच्या सोहळयातून.. 

तू भेटत रहा ,
पापण्याआड अश्रुंच्या साठवातुन
डोंळयाआड जपलेल्या आठवातुन.. 

तू भेटत रहा ,
अबोल शांत चांदण्यातुन
ग्रीष्माच्या कठोर भाजन्यातुन..

तू भेटत रहा ,
अर्जुन झालो.. तर कृष्णसखा बनुन..
झालोच दुर्योधन... तर कर्ण पाठीराखा बनुन ..

तू भेटत रहा.....!!!

विनायक 
२६ मार्च ०९

No comments:

Post a Comment

प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो  रात्र सायली होते ,  तुझिया अस्तित्वाने  श्लोक-शायरी होते।  मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...