कवितेला असं लागतच काय?
हिरवं पान ..हिरवं देठ..अन भावुक सखिची गळा भेट..
कवितेला असं लागतच काय?
थोड़ा पाउस..थोडंस उन ..अन तिचा कटाक्ष हसून ..
कवितेला असं लागतच काय?
फुललेलं फुल..खुलणारी कळीं..अन तिच्या गालावरची खळीं..
कवितेला असं लागतच काय?
भिजली वाळु..फेसाळती लाट..अन तिच्या कुशितली पहाट..
Tuesday, July 19, 2011
तर्पण
मी मंत्राग्नी द्यायला नाही आलो
चितेवर तुझ्या ..,
कारण मला पक्कं ठाऊक होतं
तू मरणार नाहीस ..
तू मेल्याची खरी अफवा
उडवली होती कुणी तरी ..
खरेतर ,पिकलं पान होतं ते,
जे झडलं पानगळीत ..
माझे डोळे अजून अडकलेत
तुझ्या दूरदृष्टीत ..
ज्यातून अजून तशीच दिसते
सारी भल्या-बु-याची दुनिया ..
जशी तुला दिसायची !!
कुठे काहीच फरक नाही पडला ,
माझ्या बोटात अजून तुझीच ताकत आहे ,
लिहायला घेतो जेव्हा लेखणी हाती ,
तूच अवतरतेस माझ्या जागी !!
धमन्यातून जे वाहे ते तुझेच रक्त आहे ..
माझ्या सुरातून तुझाच नाद येत आहे ..
नालायकी माझी तुझ्या आवाजात गात आहे ..
लाचारी हा जुना रोग शरीरात वाहे ..
समाधीवर ज्याने नाव लिहिलं तुझं..
तो ठार खोटारडा बापुडा जीव आहे ..
तू माझ्या अंतरी अजून सजीव आहे ..
अन झालेच तर..
तर्पण माझे तुझ्या ओंजळीने व्हावे ..!!
.
.
विनायक ,
(अनुवादित )
मुळ रचना : निदा फाजली
Subscribe to:
Post Comments (Atom)
प्रलयगीत
दिवस मोगरा होतो रात्र सायली होते , तुझिया अस्तित्वाने श्लोक-शायरी होते। मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...
-
चल आता सुरु करूत .. आपला नक्षत्रांचा प्रवास.. सापदलीच तर जिन्कुत सारी .. आणि करुयात त्यांची आरास.. मग आणखी दोघे चौघे येतील आपल्यामागे ...
-
दिवस मोगरा होतो रात्र सायली होते , तुझिया अस्तित्वाने श्लोक-शायरी होते। मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...
-
कवितांची बंदुक करावी , त्यात वेग वेगळ्या भावनांच्या कविता, गोळ्या म्हणून भराव्या ,, शरीरापेक्षा जास्त त्या मनाला भिडाव्या .. अन हवे त...
No comments:
Post a Comment