तुझ्या मौन रागात
युगांच्या कथा
तुझी फकीरी
लाख मोलाची सख्या ,
माझ्या नशिबी
सुबत्तेच्या व्यथा . . !!
नक्षत्र पावसाळी
तुझ्या ओठी वसते
इथे दुष्काळ असा की
फक्त पाणी म्हणण्या
ओठां मिठी बसते.. !!
तुझ्या रौद्रभाळी
पिढ्यांची चिंता
आहे भाग्यकरंटे
कपाळ माझे
हात जोडोनी म्हणतो
पाहील नियंता
तु तस्बीरीतुनी जेव्हा
जगी नित्य पाहतो,
तू अव्हेरले ज्याला
त्याचे मंदिर झाले ,
तुझ्या गाली बुद्ध
मिश्किल हसतो !!
समजली राधा की
मनुष्य कृष्ण होतो,
पण अनय होणे जमले की,
कृष्ण खरा मुक्त होतो !!!
#Vinayaki
No comments:
Post a Comment