Sunday, July 26, 2009

ज्ञानेश्वर जाह्ल्याचे feeling



आताशा गाव सोडताना ..
वेगळे वाटायचे बंद झाले आहे..
पाउस तसाच भिजवतो सगळीकडे ..
उन्हं तापतात तशीच सगळीकडे..
आता एका गावातून दुसऱ्या  गावी पोहचताना ..
घरी परतल्यासारखे वाटते ..
मला कळत नाही ..!!

हे ज्ञानेश्वर जाह्ल्याचे feeling कुठून आलंय ?

कर्म करताना फळाची अपेक्षा करू नको..

कृष्ण गेला सांगून ...माउली गेले लिहून ..
त्यांचं  सांगायला ..यांचं  रुपांतर करायला..काय जातं..?
असं जगायचं म्हणलं तर मरणं सोपं होतं...!!

आयला कळत नाही हे anti ज्ञानेश्वरी feeling कुठून आलंय?

जाणीवा सा-या जपताना .. नेणीवेचे प्रश्न उगाच..!!
माणसासारखं  जगताना देवासारखं  का वाटतंय ?
सगळं feel feel मध्ये उतरवलं मनातलं .
आता feelingless feel होतंय..
आता माणसापेक्षा वेगळं वाटतंय..
इथे वर हलके  वाटतंय ..!!

"अरे , माउली तुम्ही..?"
"बघ म्हणलं होतं न?
कृती कर .. प्रचीती येयील.."...

...............................................विनायक

1 comment:

प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो  रात्र सायली होते ,  तुझिया अस्तित्वाने  श्लोक-शायरी होते।  मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...