कवितेला असं लागतच काय?
हिरवं पान ..हिरवं देठ..अन भावुक सखिची गळा भेट..
कवितेला असं लागतच काय?
थोड़ा पाउस..थोडंस उन ..अन तिचा कटाक्ष हसून ..
कवितेला असं लागतच काय?
फुललेलं फुल..खुलणारी कळीं..अन तिच्या गालावरची खळीं..
कवितेला असं लागतच काय?
भिजली वाळु..फेसाळती लाट..अन तिच्या कुशितली पहाट..
Monday, August 10, 2009
नुसत्या अस्तित्वाने माझ्या..
मला एकदा वा-यासारखे जगायचे आहे..
कुणालाही न दिसता ..
नुसत्या अस्तित्वाने माझ्या..
या चराचराला जगवायचं आहे ..
मला एकदा चंद्रासारखे लपायचे आहे..
दर्शनही न देता स्वत:चे ..
नुसत्या अस्तित्वाने माझ्या ..
सुर्यालाही मागे लपवायचे आहे..
मला बनायचा आहे..अंधार अथांग..
न उगम .. न अंत.. अन तरीही..
नुसत्या अस्तीवाने माझ्या..
प्रकाशाला द्यायचा आहे थांग..!!!
..............................................विनायक...
..........................................२३/जून/२००५
Subscribe to:
Post Comments (Atom)
प्रलयगीत
दिवस मोगरा होतो रात्र सायली होते , तुझिया अस्तित्वाने श्लोक-शायरी होते। मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...
-
तुझं बरं चाललं आहे .. माहीत आहे मला ! असंच एकदा फिरत धूमकेतूसारखा मी येईन .. तुझ्या गावी , तुझ्या घरी ! मला खरंतर पुढच्या प्रवासाला निघ...
-
दिवस मोगरा होतो रात्र सायली होते , तुझिया अस्तित्वाने श्लोक-शायरी होते। मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...
-
चल आता सुरु करूत .. आपला नक्षत्रांचा प्रवास.. सापदलीच तर जिन्कुत सारी .. आणि करुयात त्यांची आरास.. मग आणखी दोघे चौघे येतील आपल्यामागे ...

chhan aahe
ReplyDelete