Saturday, May 19, 2012

अंदाज


मला आता कशाचाच अंदाज येत नाही ..
इतका घुसमटलो की माझाही मला आवाज येत नाही ..!!

किती प्रवास करतो थकतो  कितीकदा मी ,
तरी जो हवा मला तो गाव येत नाही ..

किती वेळा ठरवले विसरून जायचे तुला ..
तरी ओठावर  दुसरे नाव येत नाही ..

हात जोडतो किती प्रार्थना करतो बरी ,
तरी डोळ्यात अजून तो भाव येत नाही ..

मी उपचार अनेक केले, दाबले व्रण सारे ,,
आता कुणा समोर ही तू दिला घाव येत नाही ..

मी प्रयत्न केले खूप रक्त आटवले सारे ..
पण हृदये तोडण्याचा अजून सराव येत नाही ..

विनायक

No comments:

Post a Comment

प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो  रात्र सायली होते ,  तुझिया अस्तित्वाने  श्लोक-शायरी होते।  मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...