Friday, July 5, 2013

पाऊस तिचा त्याचा !!

एक सांगू..?

या वेळी पावसाने कस्स बरसायला हवं?

रिम झिम रिम झिम..
रात्र न दिवस ..
अन झिरपून अंग प्रत्यांगात हळू हळू ..

ठिसूळ करायला हवं सारं ,
तन, मन, बुद्धी ,विचार ..
अन उचकटून सगळ ..
विस्कटून टाकायला हवं ..

तुझ्याशिवाय पुन्हा सुरुवात करायची म्हणता 
इतकं तरी व्हायला हवं ..!
इतकं तरी व्हायला हवं ..!!
.
.
.
पुन्हा सांगू ..?

पावसाने कस बरसायला हवं ?

जोरदार !!
एकाच दिवसात ,
भेटून अवचित रस्त्यात ,
एकटा गाठून..

सोबत कुणी नाही याची जाणीव देऊन ..
तू जिथे असतेस तिथे कळ देऊन ..
उन्मळून पाडायला हवं ..

तू नसताना पाउस आल्यावर 
इतकं तरी व्हायला हवं ..!
इतकं तरी व्हायला हवं ..!!
.
.
.
खरं सांगू का ?

पावसाने या वेळी बरसायलाच नको..
भलं-बुरं,नवं-जुनं 
तसंच आत जपून ..
कुणा कुणाला हे सगळं दाखवायलाच नको..

आता कुठला विस्कटतो अन उन्मळतो मी 
हे त्याला कळायला हवं ..

एकतर 
त्याने गप गुमान डोळे मिटून 
माझ्या घरावरून निघायला हवं ..

नाहीतर 
तू ठरवून दिल्याप्रमाणं त्याला मी ,
तू नसताना टाळायला हवं .. !!

इतकं तरी व्हायला हवं ..!
इतकं तरी व्हायला हवं ..!!

विनायक 

No comments:

Post a Comment

प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो  रात्र सायली होते ,  तुझिया अस्तित्वाने  श्लोक-शायरी होते।  मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...