कवितेला असं लागतच काय?
हिरवं पान ..हिरवं देठ..अन भावुक सखिची गळा भेट..
कवितेला असं लागतच काय?
थोड़ा पाउस..थोडंस उन ..अन तिचा कटाक्ष हसून ..
कवितेला असं लागतच काय?
फुललेलं फुल..खुलणारी कळीं..अन तिच्या गालावरची खळीं..
कवितेला असं लागतच काय?
भिजली वाळु..फेसाळती लाट..अन तिच्या कुशितली पहाट..
Monday, May 2, 2011
चंद्र , ती आणि मी ...
आता अंधार पडेल
मग चंद्र येईल साथीला ,
मी हरवून जाईन ,
त्याच्याशी गप्पा मारेन
त्याला विचारेन तुझ्याबद्दल ..
तो म्हणेल -आहे बरी..!
मी म्हणेन " सांग न हकीकत खरी .."
तो डिवचेल मला ,
म्हणेल - हातात मोबाइल समोर कंप्यूटर ...
sms पाठव ई-मेल कर .....
"पाठवला असत्ता रे ...
पण अशी मजा सेंड मधे नाही
प्रेमिकेचा क्षेम विचारायला
तुझ्यासारखा friend नाही ..."
मग खुलेले तोही ..
सांगेल,
तू येतेस आजही ..
त्या खिडकीशी ..
त्याला बघायला ..
"बर ,अजुन ?"
सांगेल की,
तुज्या तारकांचा हिशोब जास्त आहे
"कसा ?"
म्हणेल
उशिरा लागतो डोळा तिचा,
जाग ही लवकरच येते तुझ्या पेक्षा
सकाळी उठून सवयीने..
तुला करते पहिला message ...
"पण..पण.. मला नाही येत तिचा message "
तू साला IT वाला .. logical !
तिने स्वत:चा no. save केला आहे तुझ्या नावाने
त्याच नावाला message करुन ...
हसते हळूच तुझा नाव Inbox मधे बघून ..
"बर बर अजुन?"
हसेल गालात ,
अजुन काय ?
बास इतकच...!
आहे बरी .. तुझी परी...!
अन
मग सांगेल हकीकत खरी...!
संसारात रमली आहे .. सुखात आहे..
Inbox मधले message वाचते ..
अन.. delete ही करते..
पोराला झोपवाताना उशीर होतोच ..
नव -यासाठी डब्बा ही लवकर उठून बनवते..
मी निघताना पहाटे शेवटी ...
म्हणेल , एक मात्र खरं सांगू ..?
कधी तरी हरवून माझ्याकडे बघताना ,
नवरा विचारतो ,
चंद्रामधे कोणाला हुडकतेस ?
ती म्हणते ,
"तुलाच ...........................!"
..................................................विनायक
Subscribe to:
Post Comments (Atom)
प्रलयगीत
दिवस मोगरा होतो रात्र सायली होते , तुझिया अस्तित्वाने श्लोक-शायरी होते। मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...
-
तुम मेरे क़िताब की , ना शुरुआत हो न तो अंतिम पन्ना, तुम बुकमार्क हो ! जिसे अंत या आरंभ से कोई फ़र्क नहीं पड़ता , जो सिर्फ ये सूचित करने ...
-
दिवस मोगरा होतो रात्र सायली होते , तुझिया अस्तित्वाने श्लोक-शायरी होते। मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...
-
चल आता सुरु करूत .. आपला नक्षत्रांचा प्रवास.. सापदलीच तर जिन्कुत सारी .. आणि करुयात त्यांची आरास.. मग आणखी दोघे चौघे येतील आपल्यामागे ...

aawadali kavitaa
ReplyDelete