की मन आजही थरारतं..
जस पहिल्या अवचित सरींनी
पान अन पान शहारंत..
माझ्याकडचा निशिगंध वेडा,
आजही तसाच बहरतो..
तू यावीस खुडण्यास म्हणुन
गंध तुझ्या घरभर फिरवतो..
तू लावलेला मोगरा,
आजही जोमाने फुलतो..
हलकासा सुगंध त्याचा मग
माझ्या मानत सलतो..
अंगणातली रातराणी तुझी
आजही निस्तब्ध आहे ..
माझ्या घरचा प्राजक्त मात्र
तिच्यावरच लुब्ध आहे
आपण मिळून लावलेलं
रोप आजही लाजतं..
माझ्या वरून वहिल्या वार्यानेही
लगेच पानं मिटतं
माहेरी आलीस की, एकदा
बाजुच्या वृन्दावनात येउन जा..
अजूनही तहानलेल्या तुळशीला,
पाणी थोड़ा देऊन जा..
--------------------------------------विनायक
chan ahe
ReplyDelete