Thursday, June 22, 2017

आत्मशोध ..४

स्वतंत्र 'मी' म्हणून जगायला ..
नक्की कधी सुरुवात केली?


अस्तित्वाची जाणीव नक्की कधी झाली ?
नाळ तुटली तेव्हा ?
अन ती नक्की कधी तुटली?
अन कशा कशाची ?
अस्तित्वासाठी आईशी ..
पहिल्यांदा खोटं बोललो ,तेव्हा सत्याशी ..
पहिल्या चोरट्या नजरेने बालपणाशी ..
पैशापायी गावाशी ..
ठरवून पाप करतना देवाशी ..


इतक्यांशी जुळलेली नाळ तुटली नेहमी ..
आता श्वासांशी असलेली नाळ तुटेल ..
तेव्हा विशेष वाटणार नाही माझे मलाच ..
अन तेव्हा नाळ जुळेल अवघ्या ब्रह्मांडाशी ,,,!!
मग इतके दिवस स्वतंत्र मी म्हणून जागून उपयोग काय ?


खरेच नाळ जुळली - तुटली नसती तर ..
आत्मशोध सुरूच नसता झाला...

विनायक

No comments:

Post a Comment

प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो  रात्र सायली होते ,  तुझिया अस्तित्वाने  श्लोक-शायरी होते।  मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...