माझ्या मुला ,
तु राजकुमार नको बनुस ..
कारण मग राजकुमारी लागते ..
आता तुला डोंबारीण आवडु शकत नाही..
बरे तु स्वत: राजकुमारी निवडु शकत नाही..
कारण पुन्हा निवडलेली राजकुमारी जातीची लागते ..
तु जळणा-या रुपाचा असला ,तर ती तुपाच्या वातीची लागते..
कारण... तेलाचं तुपाला लाउ नये ..
अन बुद्धीचं माप रुपाला लाउ नये ..
बरं आता त्या राजकुमारीला राणी व्हावं लागतं,
तु लढाईवर गेला कि तिला कुढावं लागतं..
बरं डोंबारणीला कुढता येत नाही ,,
कारण.... तिला उडता येतं!!
पण तुला उडणारी नाही कुढणारी निवडावी लागते..
कारण विसरलास का ?शेवटी ती राजकुमारी असते!!
म्हणुन म्हणतो राजकुमार बनु नकोस !!
बरं आता तु राजकुमार झाला ,
तर उद्या तुला राजा व्हावं लागणार..!
तुला जनतेपायी युद्धा-बिद्धा वर जावं लागणार ..अन पुन्हा राणीला रडवावं लागणार ..
जनतेतलं आपल्या कुलाच्या विश्वासाचं रोप, तीच्या अश्रुंनी वाढवावं लागणार !!
बरं ,आयुष्यात शेवटी तुला आत्मचरित्र लिहिता नाही येणार..
कारण ते लिहुन तु ते मांडलं,
हे सगळं लेखणीतून सांडलं ,
तर लोक भरल्या पोटाचं दुखणं बोचतं म्हणणार ..
आणि सुखभरल्या गादीवर फ़ुलपण टोचतं म्हणणारं..
आत्मचरित्राला उद्या पुरस्कार मिळाला तर ”पैशांनी विकत म्हणणार .”.
अणि जास्त खपलं तर, ”राजा आहे, देईलही फ़ुकट म्हणणार ..”
पण हे सगळं तुला न लिहुन सांगावं लागणार आहे ..
तुझ्या डोळ्यातल्या पाण्याला थांबवावं लागणार आहे..
आणि लिहिलंच चुकुन तु हे सारं,
तर त्याला "चरित्र" म्हणता येणार नाही..
कारण...
विसरलास का ?
तुला डोंबारीण आवडली होती..
तिच्या सोबत उडताना तुला पकडंलंय वा-यानी..
आणि त्याचा निर्णय करायचा आहे सा-यांनी ..
विनायक
तु राजकुमार नको बनुस ..
कारण मग राजकुमारी लागते ..
आता तुला डोंबारीण आवडु शकत नाही..
बरे तु स्वत: राजकुमारी निवडु शकत नाही..
कारण पुन्हा निवडलेली राजकुमारी जातीची लागते ..
तु जळणा-या रुपाचा असला ,तर ती तुपाच्या वातीची लागते..
कारण... तेलाचं तुपाला लाउ नये ..
अन बुद्धीचं माप रुपाला लाउ नये ..
बरं आता त्या राजकुमारीला राणी व्हावं लागतं,
तु लढाईवर गेला कि तिला कुढावं लागतं..
बरं डोंबारणीला कुढता येत नाही ,,
कारण.... तिला उडता येतं!!
पण तुला उडणारी नाही कुढणारी निवडावी लागते..
कारण विसरलास का ?शेवटी ती राजकुमारी असते!!
म्हणुन म्हणतो राजकुमार बनु नकोस !!
बरं आता तु राजकुमार झाला ,
तर उद्या तुला राजा व्हावं लागणार..!
तुला जनतेपायी युद्धा-बिद्धा वर जावं लागणार ..अन पुन्हा राणीला रडवावं लागणार ..
जनतेतलं आपल्या कुलाच्या विश्वासाचं रोप, तीच्या अश्रुंनी वाढवावं लागणार !!
बरं ,आयुष्यात शेवटी तुला आत्मचरित्र लिहिता नाही येणार..
कारण ते लिहुन तु ते मांडलं,
हे सगळं लेखणीतून सांडलं ,
तर लोक भरल्या पोटाचं दुखणं बोचतं म्हणणार ..
आणि सुखभरल्या गादीवर फ़ुलपण टोचतं म्हणणारं..
आत्मचरित्राला उद्या पुरस्कार मिळाला तर ”पैशांनी विकत म्हणणार .”.
अणि जास्त खपलं तर, ”राजा आहे, देईलही फ़ुकट म्हणणार ..”
पण हे सगळं तुला न लिहुन सांगावं लागणार आहे ..
तुझ्या डोळ्यातल्या पाण्याला थांबवावं लागणार आहे..
आणि लिहिलंच चुकुन तु हे सारं,
तर त्याला "चरित्र" म्हणता येणार नाही..
कारण...
विसरलास का ?
तुला डोंबारीण आवडली होती..
तिच्या सोबत उडताना तुला पकडंलंय वा-यानी..
आणि त्याचा निर्णय करायचा आहे सा-यांनी ..
विनायक
No comments:
Post a Comment