नक्की कधी कळायला लागलं ..?
कि चोर - पोलीस खेळात ..
पोलिसच चोर असू शकतात !
अन कधी उमगलं आपल्याला,
कि बुद्धी वापरून झालं तर ठीक..
नाहीतर बळाचाच वापर जास्त करता येतो!
अन कधी कळलं ?
कि आयुष्याच्या सापशिडी मध्ये ,
फासे आपल्या नाही,
नियतीच्याच हातात असतात!
अन पत्यात जसे हात ओढतात ,
तसे पाय ओढायचे असतात !
कधी कळलं ?
कि लग्नात माणसाला माणूस नाही ,
जातीला जात लागते ,
संसाराला प्रेम नाही ,पैसा लागतो !
पोरांना बाप नाही ,संपत्ती लागते !
आत्मशोध घेताना याची उत्तर मिळावी ..
म्हणजे आत्म्याचा शोध संपूर्ण थांबेल ,
आणि आत्मशोध घेताना ..
माणुसकी सोडून आपण नक्की कधी 'असे' झालो ,
या उपप्रश्नांचे एक आवर्तन थांबेल ..
.
विनायक
No comments:
Post a Comment