Thursday, June 22, 2017

आत्मशोध २



नक्की कधी कळायला लागलं ..?
कि चोर - पोलीस खेळात ..
पोलिसच चोर असू शकतात !

अन कधी उमगलं आपल्याला,
कि बुद्धी वापरून झालं तर ठीक..
नाहीतर बळाचाच वापर जास्त करता येतो!

अन कधी कळलं  ?
कि आयुष्याच्या सापशिडी मध्ये ,
फासे आपल्या नाही,
नियतीच्याच हातात असतात!

अन पत्यात जसे हात ओढतात ,
तसे पाय ओढायचे असतात !

कधी कळलं  ?
कि लग्नात माणसाला माणूस नाही ,
जातीला जात लागते ,
संसाराला प्रेम नाही ,पैसा लागतो !
पोरांना बाप नाही ,संपत्ती लागते !

आत्मशोध घेताना याची उत्तर मिळावी ..
म्हणजे आत्म्याचा शोध संपूर्ण थांबेल ,
आणि आत्मशोध घेताना ..
माणुसकी सोडून आपण नक्की कधी 'असे' झालो ,
या उपप्रश्नांचे एक आवर्तन थांबेल ..
.
विनायक

No comments:

Post a Comment

प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो  रात्र सायली होते ,  तुझिया अस्तित्वाने  श्लोक-शायरी होते।  मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...